७. असहकार चळवळ स्वाध्याय इयत्ता आठवी इतिहास | Asahakar Chalval swadhyay prashn uttare iyatta 8vi etihas.

Asahakar Chalval swadhyay iyatta aathvi | असहकार चळवळस्वाध्याय इयत्ता ८वी  इतिहास

8vi Asahakar Chalval prashn uttare | Itihas swadhyay 8th | Asahakar Chalval Swadhyay | इयत्ता आठवी इतिहास स्वाध्याय pdf | असहकार चळवळ प्रश्न उत्तरे

 

प्रश्न १. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने  पुन्हा लिहा.


(१) गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात ..........  या देशातून केली.

(अ) भारत

(ब) इंग्लंड

(क) दक्षिण आफ्रिका

(ड) म्यानमार

उत्तर: गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात दक्षिण आफ्रिका या देशातून केली.

 

8th std history digest pdf Maharashtra board 8vi Asahakar Chalval prashn uttare Itihas swadhyay 8th Asahakar Chalval Swadhyay  उत्तरे असहकार चळवळ प्रश्न उत्तरे स्वाध्याय असहकार चळवळ८वी इतिहास

(२) शेतकऱ्यांनी .......... जिल्ह्यात साराबंदीची  चळवळ सुरू केली.

(अ) गोरखपूर

(ब) खेडा

(क) सोलापूर

(ड) अमरावती

उत्तर: शेतकऱ्यांनी खेडा जिल्ह्यात साराबंदीची  चळवळ सुरू केली.

 

(३) जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून  रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या ..........  या किताबाचा त्याग केला.

(अ) लॉर्ड

 (ब) सर

(क) रावबहादूर

 (ड) रावसाहेब

उत्तर: जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून  रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या सर  या किताबाचा त्याग केला.

 


असहकार चळवळ स्वाध्याय दाखवा | इयत्ता आठवी विषय इतिहास धडा सातवा  प्रश्न उत्तरे | असहकार चळवळ प्रश्न उत्तरे | स्वाध्याय असहकार चळवळ८वी इतिहास

प्रश्न २. पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.


(१) दक्षिण आफ्रिकेत कृष्णवर्णीयांवर १९०६ च्या आदेशान्वये कोणती बंधने घातली गेली ?

उत्तर: दक्षिण आफ्रिकेत कृष्णवर्णीयांवर १९०६ च्या आदेशान्वये ओळखपत्रे बाळगणे सक्तीचे केले आणि त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधने घातली गेली.

 

(२) गांधीजींनी भारतात पहिला सत्याग्रह कोठे केला?

उत्तर: चंपारण्य येथे गांधीजींनी भारतात पहिला सत्याग्रह केला.

 

(३) जालियनवाला बागेत गोळीबाराचा आदेश देणारा अधिकारी कोण होता?

उत्तर: जालियनवाला बागेत गोळीबाराचा आदेश देणारा अधिकारी जनरल डायर हा  होता.

 


प्रश्न ३. पुढील प्रश्नांची उत्तरे २५ ते ३० शब्दांत लिहा.

 

(१) सत्याग्रहाचे तत्त्वज्ञान स्पष्ट करा.

उत्तर:

१)    सत्याग्रह म्हणजे सत्याचा, न्यायाचा आग्रह धरणे.

२)अन्याय करणाऱ्या व्यक्तीला संयमाने व अहिंसेच्या मार्गाने सत्य व न्याय याची जाणीव करून देणे व तिचे मतपरिवर्तन करणे हे सत्याग्रहाचे उद्‌दिष्ट होते.

३)   सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तीने हिंसा व असत्य यांचा वापर करता कामा नये.

४) अन्यायी व्यक्तीचे मतपरिवर्तन अहिंसक आणी सत्याच्या मार्गाने करायचे. सत्याग्रहाचे हे नवीन तत्वज्ञान गांधीजींनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात रुजवले.

 

(२) स्वराज्य पक्षाची स्थापना का करण्यात आली ?

उत्तर:

१) असहकार चळवळीमध्ये विधीमंडळाच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात आला होता.

२)   चौराचौरी घटनेनंतर गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली .

३) अशा स्थितीमध्ये सरकारची अडवणूक करण्यासाठी निवडणुका लढवून कायदेमंडळात प्रवेश करण्याची कल्पना मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास आदी नेत्यांनी मांडली.

४) सरकारच्या अन्याय्य धोरणांना विधिमंडळामध्ये प्रखर विरोध करण्याच्या उद्देशाने या नेत्यांनी १९२२ मध्ये राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना केली



प्रश्न ४. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

 

(१) रौलट कायद्याला भारतीय जनतेने विरोध केला.

उत्तर:

१)पहिल्या महायुद्धाचा भारतावरही मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला यामुळे भारतीयांच्या मनात ब्रिटीश शासनाविरोधात निर्माण झालेला असंतोष दडपण्यासाठी व त्यासंबंधी उपाययोजना सुचवण्यासाठी रौलट कायदा संमत केला.

२) या कायद्याने कोणत्याही भारतीयाला विनाचौकशी अटक करण्याचा अधिकार सरकारला दिला.

३) तसेच न्यायालयात खटला न भरता तुरुंगात डांबण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला.

४) दिलेल्या शिक्षेविरुद्ध अपील करण्यास मनाई या कायद्याने करण्यात आली.

            रौलट कायद्यातील या जुलमी तरतुदींमुळे या कायद्याला भारतीय जनेतेने विरोध केला.

 

Asahakar Chalval Swadhyay | इयत्ता आठवी इतिहास स्वाध्याय pdf | असहकार चळवळ प्रश्न उत्तरे | इयत्ता आठवी असहकार चळवळ धडा ७वा  स्वाध्याय


(२) गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली.

उत्तर: गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली कारण,

१)    असहकार चळवळ आटोक्यात आणण्यासाठी सरकारने दडपशाही सुरू केली.

२) उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौरीचौरा येथे फेब्रुवारी १९२२ मध्ये शांततापूर्ण मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला.

३)   त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने पोलीस चौकीला आग लावली.

४) यात एका पोलीस अधिकाऱ्यासह २२ पोलीस ठार झाले.

५)  या घटनेमुळे गांधीजी व्यथित झाले. १२ फेब्रुवारी १९२२ रोजी गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली.

 

(३) भारतीयांनी सायमन कमिशनवर बहिष्कार घातला.

उत्तर: भारतीयांनी सायमन कमिशनवर बहिष्कार घातला कारण,

१)    १९१९ च्या माँटेग्यू- चेम्सफर्ड कायद्याने दिलेल्या सुधारणा असमाधानकारक होत्या.

२)   त्यामुळे भारतीय जनतेत असंतोष होता.

३) या पार्श्वभूमीवर इंग्रज सरकारने १९२७ मध्ये सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नियुक्त केले.

४)  या सात सदस्यीय कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता. म्हणून भारतातील राजकीय पक्षांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला

 

(४) भारतात खिलाफत चळवळ सुरू करण्यात आली.

उत्तर:

१)   तुर्कस्तानचा सुलतान हा जगभरातील मुस्लिमांचा खलिफा म्हणजे धर्मप्रमुख होता.

२)   पहिल्या महायुद्धात तुर्कस्तान इंग्लंडच्या विरोधी गटात होते.

३) युद्धात भारतीय मुस्लिमांचे सहकार्य मिळवण्यासाठी युद्धसमाप्तीनंतर खलिफाच्या साम्राज्यास धक्का लावण्यात येणार नाही, असे आश्वासन इंग्लंडच्या प्रधानमंत्र्यांनी दिले.

४) पण युद्ध समाप्तीनंतर इंग्लंडने हे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे मुस्लिमांमध्ये संतापाची लाट उसळली.

५)  खलिफाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी जी चळवळ सुरू केली, तिला ‘खिलाफत चळवळ’ असे म्हणतात.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.