११. राष्ट्ररक्षक मराठे स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी इतिहास नागरिकशास्त्र | Samrajyachi vatchal Swadhyay Iyatta Satavi Itihas

राष्ट्ररक्षक मराठे इयत्ता सातवी इतिहास नागरिकशास्त्र स्वाध्याय प्रश्न उत्तरे  | Samrajyachi vatchal swadhyay prashn uttare iyatta satavi etihas nagarikshastra

राष्ट्ररक्षक मराठे भारत धडा अकरा स्वाध्याय  इतिहास नागरिकशास्त्र स्वाध्याय सातवी  Rashtrarakshak marathe swadhyay 7vi  Rashtrarakshak marathe swadhyay prashn uttar


प्र. १. कोण बरे ?


() अफगाणिस्तानातून आलेले ....

उत्तर: पठाण


() हिमालयाच्या पायथ्याशी स्थायिक झालेले ....

उत्तर: रोहिले


() नानासाहेब पेशव्यांचा भाऊ ....

उत्तर: रघुनाथराव


() मथुरेच्या जाटांचा प्रमुख....

उत्तर: सुरजमल जाट


() पैठणजवळ राक्षसभुवन येथे निजामाला पराभूत करणारे....

उत्तर: पहिले माधवराव पेशवे.


प्र. २. थोडक्यात लिहा.


() अटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकला

उत्तर:

१) मराठ्यांचे उत्तरेत असलेले वर्चस्व रोहिल्यांचा सरदार नजीबखान याला सहन होत नव्हते. म्हणून त्याच्या सांगण्यावरून अफगाणीस्तानच्या अब्दालीने पाचव्या वेळी दिल्ली जिंकली.

२) रघुनाथराव व मल्हारराव होळकर हे पुन्हा उत्तरेत गेले व त्यांनी दिल्ली जिंकली.

३) अब्दालीच्या अधिकाऱ्यांना हुसकावून पुन्हा पंजाब जिंकून घेतला.

४) त्यानंतर अब्दालीच्या सैनिकांचा पाठलाग करीत इ.स. १७५८ मध्ये अटकेपर्यंत पोहोचले. अशा रीतीने मराठ्यांनी अटकेवर आपला ध्वज फडकवला.

 

() अफगाणांशी संघर्ष

उत्तर:

१) अफगाणिस्तान चा बादशाहा अहमदशाह अब्दाली याला भारतातील संपत्तीचे आकर्षण होते. इ.स. १७५१ मध्ये त्याने पंजाबवर आक्रमण केले.

२) मुघलांना अब्दालीच्या आक्रमणाची भीती होती. म्हणून आपल्या संरक्षणासाठी त्यांनी मराठ्यांशी करार केला.

३) या करारानुसार छत्रपतींच्या वतीने पेशव्यांनी शिंदे-होळकरांना फौजा दिल्लीच्या संरक्षणार्थ पाठवल्या ही बातमी पोहोचताच अब्दाली मायदेशी परतला.

४) पुढे रघुनाथ राव अब्दालीशी मुकाबला करण्यासाठी उत्तरेत गेला. मराठ्यांनी अब्दालीच्या अधिकाऱ्यांना पिटाळून दिल्ली व पंजाब जिंकून अटकेपर्यंत धडक मारली.

५) पुढे अब्दाली व सदाशिवरावभाऊ यांची पानिपतावर गाठ पडली. ही पानिपत ची तिसरी लढाई होती. या लढाईत मराठ्यांचा दारुण पराभव झाला.


राष्ट्ररक्षक मराठे या पाठाचा स्वाध्याय | पाठ  अकरा  राष्ट्ररक्षक मराठे स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी


() पानिपतच्या लढाईचे परिणाम

उत्तर:

इ.स. १६६१ साली झालेल्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा दारुण पराभव झाला. या लढाईचे परिणाम पुढीलप्रमाणे झाले:

१) महाराष्ट्रातील एक तरुणपिढी मारली गेली.

२) मोठ्या प्रमाणात युद्धसामग्री नष्ट झाल्याने मराठ्यांचे खूप मोठे नुकसान झाले.

३) मराठ्यांचे उत्तरेतील प्रभुत्व कमी झाले.

४) अनेक पराक्रमी सरदार मारले गेल्यामुळे मराठ्यांचा प्रभाव कमी झाला.

५) मराठ्यांचा प्रभाव कमी झाल्याने निजाम, हैदरआली या जुन्या शत्रूंनी मराठ्यांच्या प्रदेशावर पुन्हा आक्रमण करणे सुरु केले.

 

प्र.३. घटनाक्रम लावा.


() राक्षसभुवनची लढाई

() टिपू सुलतानचा मृत्यू

() माधवराव पेशव्यांचा मृत्यू

() पानिपतची लढाई

() बुराडी घाटची लढाई

 

उत्तर:

१) बुराडी घाटची लढाई

२) पानिपतची लढाई

३) राक्षसभुवनची लढाई

४) माधवराव पेशव्यांचा मृत्यू

५) टिपू सुलतानचा मृत्यू


प्र. ४. पुढील चौकटीत पाठात आलेल्या व्यक्तींची नावे शोधा.

 

११. राष्ट्ररक्षक मराठे स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी इतिहास नागरिकशास्त्र | Samrajyachi vatchal Swadhyay Iyatta Satavi Itihas


उत्तर:

§     जानकोजी

§     महादजी

§     जयप्पा

§     बाळाजी विश्वनाथ

§     माधवराव

§     नानासाहेब

§     सदाशिवराव भाऊ

§     मल्हारराव

 

 *************

Itihas nagarikshastra swadhyay satavi pdf | Itihas nagarikshastra swadhyay satvi question answers

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.