९. स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व स्वाध्याय इयत्ता आठवी इतिहास | Swatantryladhyache Antim Parv Swadhyay

Swatantryladhyache Antim Parv Swadhyay Iyatta 8vi  | स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व स्वाध्याय इयत्ता ८वी  इतिहास


प्र.१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.

(अंदमान व निकोबार, ऑगस्ट क्रांती, विनोबा भावे)


(१) वैयक्तिक सत्याग्रहाचे ............ हे पहिले सत्याग्रही होते.

उत्तर: वैयक्तिक सत्याग्रहाचे विनोबा भावे हे पहिले सत्याग्रही होते.


(२) १९४२ च्या राष्ट्रव्यापी आंदोलनाला ..........  असे म्हटले जाते.

उत्तर: १९४२ च्या राष्ट्रव्यापी आंदोलनाला ऑगस्ट क्रांती असे म्हटले जाते.


(३) नोव्हेंबर १९४३ मध्ये जपानने ....... बेटे जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली.

उत्तर: नोव्हेंबर १९४३ मध्ये जपानने अंदमान व निकोबार बेटे जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली.

 
स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व स्वाध्याय दाखवा  स्वाध्याय स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व ८वी इतिहास  8th std history digest pdf Maharashtra board  8vi Maharashtra Swatantryladhyache Antim Parv  prashn uttare

स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व स्वाध्याय प्रश्न उत्तरे |इयत्ता आठवी स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व धडा नऊ स्वाध्याय | स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व स्वाध्याय दाखवा


प्र.२. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

 

(१) नोव्हेंबर १९३९ मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले.

उत्तर:

1) १ सप्टेंबर १९३९ साली सुरु झालेय दुसर्या महायुद्धात भारत इंग्लंडच्या बाजूने सहभागी होत असल्याची घोषणा व्हाईसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांनी केली.

२) आपण युरोपात लोक्शाहीच्चे रक्षण करण्यासाठी लढत असल्याचा दावा इंग्लंडने केला.

३) हा दावा खरा असेल; तर इंग्लंडने भारताला ताबडतोब स्वातंत्र्य द्यावे, अशी मागणी राष्ट्रीय सभेने सरकारकडे केली.

४) ही मागणी  पूर्ण करण्यास इंग्लंड सरकारने नकार दिल्याने नोव्हेंबर १९३९ मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले.


(२) आझाद हिंद सेनेला शस्त्रेखाली ठेवावी लागली.

उत्तर:

१) आझाद हिंद सेना प्रतिकूल परिस्थितीतही सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांशी लढत होती.

२) परंतु आझाद हिंद सेनेला मिळणारी जपान ची लष्करी मदत बंद झाल्याने इंफाळची मोहीम अर्धवट सोडावी लागली.

३) याच काळात जपानने शरणागती पत्करल्यामुळे आझाद हिंद सेनेचा आधारच संपला होता.

४) १८ ऑगस्ट १९४५ रोजी सुभाषचंद्र बोस यांचे विमान अपघातात निधन झाल्याने आझाद हिंद सेनेला शस्त्रे खाली ठेवाली लागली.


(३) प्रतिसरकार जनतेचे प्रेणास्थान ठरले.

उत्तर:

१) भारतामध्ये ‘चले जाव’ चळवळीच्या काळात अनेक भागांत प्रतिसरकारे स्थापन झाली.

२) कायदा व सुव्यवस्था टिकवणे आणि गुन्हेगारांना शासन करणे इत्यादी कामे या सरकारांनी चोखपणे केली.

३) त्यांनी सावकारशाही ला विरोध केला.

४) साक्षरतेचे काम केले.

५) दारूबंदी, जातीभेद निर्मुलन अशी समाजसेवेची कामे केली. या विधायक कामांमुळे प्रतिसरकारे जनतेचे प्रेरणास्थान ठरले.


प्र.३. पुढील तक्ता पूर्ण करा.


उत्तर:

संघटना संस्थापक

संस्थापक

फॉरवर्ड ब्लॉक

सुभाषचंद्र बोस

इंडियन इंडिपेंडन्स लीग

रासबिहारी बोस

तुफान सेन

जी.डी. उर्फ बापू लाड.

 

8vi Maharashtra Swatantryladhyache Antim Parv  prashn uttare | Itihas swadhyay 8th Swatantryladhyache Antim Parv swadhyay


प्र.४. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

 

(१) शिरीषकुमारचे कार्य तुम्हांस कसे प्रेणादायी आहे?

उत्तर:

१) तिरंगी झेंडा घेऊन शिरीषकुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिरवणूक काढली. ‘वंदे मातरम्’ च्या घोषणा दिल्या. गोळीबारात शिरीषकुमार हुतात्मा झाले.

२) आपल्या समाजासाठी , देशासाठी आपण काहीतरी काम केले पाहिजे अशी प्रेरणा त्यांच्या कार्यातून मिळते.

३) आज स्वातंत्र्य मिळवणे हे ध्येय राहिले नाही ; परंतु आपला परिसर चांगला ठेवावा, परिसरातील लोकांमध्ये ऐकी निर्माण करावी, त्यांच्या समस्या सामुदायिकपणे दूर कराव्यात अशी प्रेरणा मिळते.

४) अन्यायाला, जुलमाला बळी न पडता अशा प्रवृत्तीबद्दल लढण्याची प्रेरणा शिरीषकुमार यांच्या कार्यातून मिळते.

 

(२) इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात का पाठवले?

उत्तर:

१) दुसऱ्या महायुद्धात  इंग्लंड ने जपानविरुद्ध लढणाऱ्या अमेरिकेच्या बाजूने भाग घेतला.

२) भारतावर इंग्लंड चे राज्य असल्याने जपान भारतावर आक्रमण करण्याची शक्यता होती.

३) जपानी फौजा भारताच्या पूर्व सीमेनजीक येथून थडकल्या.

४) जपानने भारतावर आक्रमण केल्यास त्याला प्रतिकार करण्यासाठी भारतीयांचे सहक्र्य मिळवणे इंग्लडला आवश्यक वाटू लागते. म्हणून इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात पाठवले.

 

(३) राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक झाल्याचे वृत्त देशभर पसरल्यावर कोणती प्रतिक्रिया उमटली?

उत्तर:

१) राष्ट्रीय सभेने ८ ऑगस्ट १९४२ रोजी ‘छोडो भारत’ चा ठराव संमत केल्यावर त्याच रात्री राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक झाली. हे वृत्त देशभर पसरल्यावर सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

२) ठिकठिकाणी संतप्त जनतेणे मिरवणुका काढल्या.

३) पोलिसांनी जनतेवर लाठीहल्ला, गोळीबार करूनही जनता घाबरली नाही.

४) आंदोलकांनी तुरुंग, पोलीस ठाणी, रेल्वे स्थानके यांच्यावर हल्ले केले व सरकारी कचेऱ्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले.

********

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.